Changes in the functioning of the Farmers Grievance Redressal Committee by the Government
Changes in the functioning of the Farmers Grievance Redressal Committee by the Government 
महाराष्ट्र

बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीवर सरकारच्या ‘या’ आहेत सूचना; तक्रार निवारण समितीच्या कार्यपद्धतीत असे केलेत बदल

अशोक मुरुमकर

सोलापूर : राज्यात यावर्षी एकीकडे कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन बियाणे खरेदी करुन पेरणी केली. ते बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. यावर उपाययोजना म्हणून बियाणे, खते, किटकनाशके यांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या कार्यपद्धतीत कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने बदल केला आहे.

राज्यात अपवाद वगळता अनेक भागात वेळेवर पाऊस पडत नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरणीवर परिणाम होते. मात्र, यंदा काही भाग सोडला तर वेळेवर पाऊस पडला त्यामुळे खरीपाच्या पेरणी झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, सुर्यफुल, मका, तूर, भूईमुग, कांदा, कापूस, मुग आदीची पेरणी केली आहे. मात्र, यातील काही बियाणे उगवलेच नाहीत यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यावर सरकारने परिपत्रक काढून तालुक्यातील तक्रारींची संख्या १०० पेक्षा जास्त गेल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना संबंधित तालुक्यासाठी एकापेक्षा जास्त समित्या तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेले अधिकारी संख्या लक्षात घेऊन एकापेक्षा जास्त समित्या स्थापन कराव्यात, अशा सूचना परिपत्रकाद्‌वारे राज्य सरकारचे अवर सचिव उमेश चांदिवडे यांनी दिल्या आहेत. सदर समितीने सात दिवसाच्या आत कालमर्यादीत क्षेत्रीय भेटी देऊन अहवाल अंतिम करावा, असे यात म्हटले आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात आल्या आहेत. सध्या 
तालुकास्तरावील तक्रार निवारण समितीकडून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन वेळेत तपासणी करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे त्वरीत तपासणी करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या रचनेत २०२०- २१ या वर्षासाठी सुधारणा केली आहे. तालुका कृषी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर कृषी विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्र किंवा कृषि विज्ञान केंद्र यांचे प्रतिनिधी सदस्य असणार आहेत. याबरोबर उपलब्धतेनुसार महाबीजचे प्रतिनिधी व पंचायत सिमतीचे कृषि अधिकारी किंवा मंडळ अधिकारी सदस्य असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT