farmer loan waiver 
महाराष्ट्र बातम्या

शेतकरी कर्जमाफीच्या अर्जाची मुदत 14 एप्रिलपर्यंत

सकाळवृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
 
अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पुरविण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून यूजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल. उपरोक्त कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा-ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज नि:शुल्क भरून देण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नाव ग्रीन यादीमध्ये आले नाही, मिसमॅच डाटामध्ये नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI New Rule: RBI चा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार! आता ही गोष्ट केल्याशिवाय पेमेंट होणार नाही...

IPL 2026 Marathi News: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला 'तो' यंदा RCB चा भाग नाही; फ्रँचायझी म्हणते, त्याच्यासोबतचा करार...

"म्हणून स्वप्नीलने मला 1000 रुपये दिले" ; अभिनेत्याने सांगितला खास किस्सा, म्हणाला..

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Satara Jalav Ghat Accident : देवीच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला! जळव घाटात भाविकांची गाडी उलटली; एका महिलेचा जागीच मृत्यू, आठ ते दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT