Maha E-Seva center esakal
महाराष्ट्र बातम्या

नागरिकांना आता गावातच मिळतील 560 दाखले! सोलापूर जिल्ह्यात 1431 महा ई सेवा केंद्रे मंजूर; नवीन 330 केंद्रे सुरू होणार; 12 ते 30 ऑगस्टपर्यंत करता येईल अर्ज

नागरिकांना त्यांच्याच गावात माफक दरात सर्वच शासकीय विभागांचे दाखले मिळावेत म्हणून प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी ५६० ऑनलाइन सेवा दिल्या जातात.

तात्या लांडगे

सोलापूर : नागरिकांना त्यांच्याच गावात माफक दरात सर्वच शासकीय विभागांचे दाखले मिळावेत म्हणून प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी ५६० ऑनलाइन सेवा दिल्या जातात. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एक तर पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात दोन केंद्रे असतील. आता जिल्ह्यातील ३३० गावांमध्ये नवीन महा ई सेवा केंद्रे सुरू करण्यासाठी अर्ज मागविले जात आहेत. त्याची मुदत १२ ते ३० ऑगस्टपर्यंत आहे.

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसह शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींना दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सेतू कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागायचे. त्याठिकाणी गर्दी असल्याने पुन्हा त्यांना त्याच कामासाठी जावे लागत होते. नवीन वाहन परवाना काढण्यासाठी देखील अशीच स्थिती होती. पण, आता प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्रे सुरू करण्यात आल्याने नागरिकांसह सर्वच घटकांची सोय झाली आहे. दुसरीकडे या केंद्रांद्वारे केलेल्या अर्जांवर तहसील कार्यालय असो की प्रांताधिकारी कार्यालयाकडून वेळेत निर्णय घेतला जातो. नागरिकांची कोणत्याही दाखल्यासाठी अडवणूक होणार नाही, याकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार लक्ष देत आहेत.

ज्या गावात महा ई सेवा केंद्रे नाहीत, तेथे नवीन होणार

प्रत्येक गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना गावातच सर्व शासकीय दाखले मिळतील, अशी व्यवस्था महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जायला लागू नये, त्यांचा वेळ व पैसा खर्च होणार नाही, यासाठी ही केंद्रे प्रत्येक गावांमध्ये कार्यरत आहेत. ज्या गावात ही केंद्रे नाहीत किंवा बंद आहेत अशा ३३० गावांमध्ये नवीन केंद्रे सुरू होतील.

- मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

स्थानिक, सीएससी केंद्र चालकांना प्राधान्य

गावातील स्थानिक व्यक्तीला व ज्याच्याकडे पहिले सीएससी केंद्र आहे, अशा अर्जदाराला नवीन महा ई सेवा केंद्र सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदाराला तो ऑफलाइन अर्ज १२ ते ३० ऑगस्ट दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावा लागणार आहे. सीएससी केंद्र असलेल्यांचे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांचे मागील सहा महिन्यांचे व्यवहार पाहून त्यांना परवाना दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्राची स्थिती

  • एकूण ग्रामपंचायती

  • १,०२८

  • जिल्ह्यातील मंजूर केंद्रे

  • १,६७०

  • सध्या कार्यरत केंद्रे

  • १,४३१

  • नव्याने सुरू होणारी केंद्रे

  • ३३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT