Eknath Shinde with MLAs Sakal
महाराष्ट्र बातम्या

बंडाच्या वेळी शहीद होण्याचा धोका होता; CM शिंदेंचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

बंड करताना थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असं खळबळजनक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. यावेळी त्यांचं गावात जोरदार स्वागतही करण्यात आलं. लोकांच्या आणि देवीच्या आशिर्वादानं सगळं काही सुरळीत झालं, असंही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे सातारा जिल्ह्यातल्या दरे या आपल्या मूळ गावी आले होते. त्यावेळी त्यांनी पद्मावती मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, बंड करताना थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशिर्वादाने सगळं काही सुरळीत झालं.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता खातेवाटप कधी याबद्दलही एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितलंय. शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असं विचारलं जात होतं. तो झाला. त्याप्रमाणे आता खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी होतील. त्या वेळेवरच होतील. पण आम्ही कुठेही विकासाची कामं थांबू दिलेली नाहीत. कालच आम्ही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावर भरघोस अशी मदत दिलीय. एनडीआरएफच्या नियमाच्याही दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. २ हेक्टरची मर्यादा होती, ती वाढवून तीन हेक्टर केलीय, असे अनेक निर्णय आम्ही महिन्याभराच्या काळात घेतलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT