शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी - मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी - मुख्यमंत्री 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी - मुख्यमंत्री

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नाही. मात्र कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाश्‍वत आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे हे आमचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेसोबतची युती राज्याच्या हितासाठी असल्याचे म्हणत आमच्या सरकारला शिवसेनेचा कायम पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढविल्या नाहीत. मात्र तरीही दोघांनाही यश मिळाले असल्याचे सांगत त्यामुळेच विरोधक निराश झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. भाजप आणि शिवसेनेवर जनतेने यावेळी विश्‍वास दाखविण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, विनोद तावडे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम, गिरीष महाजन, गिरीश बापट यांच्यासह अन्य काही मंत्री उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT