महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून संतपीठाची घोषणा

नामदेव कुंभार

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पैठण येथील संतपीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे. संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केल्या आहेत. संतपीठाचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद येथे उद्‍घाटन झाल्यानंतर पैठण येथे संतपीठाचे प्रत्यक्षात उद्‍घाटन मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे यांच्या हस्ते फीत कापून होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, संतपीठ उद्‍घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने गुरुवारी भव्य व सुसज्ज इमारतीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात मनमोहक रंगांमध्ये विद्युत रोषणाई केली आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सिद्धार्थ उद्यान येथील स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण केलं. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतपीठाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, 'संताची शिकवण जगभरात पोहचवण्यासाठी संतपीठाची स्थापना करण्यात येत आहे. संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केल्या आहेत. संतपीठ हे फक्त प्रेक्षणीय स्थळ राहू नये.'

मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. ते संतपीठ आपण स्थापन करत आहोत. त्या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल. संतांची शिकवण म्हणजे काय? आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही. पण जर कुणी अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, ही आम्हाला संतांची शिकवण आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन हे ५ वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईलपर्यंत जे लवकर होईल.

काय म्हणाले मुख्यमंत्री -

निजामशाच्या कोणत्याच खुणा ठेवायच्या नाहीत

निजामकालीन 150 शाळांचे पुनर्विकास करणार

घृष्णेश्वर मंदिराचा सभामंडप तयार करणार

अहमदनगर-औरंगाबाद रेल्वे मार्ग जोडण्याची दानवेंना विनंती

मराठवाड्याचा गुंठेवारीची समस्या निकाली लागणार

ज्याप्रमाणे निजामाशी लढलो, त्याप्रमाणे कोरोनाशी लढायचेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT