महाराष्ट्र बातम्या

Congress: कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश महाराष्ट्रातदेखील कायम राहणार; अशोक चव्हाण यांचा विश्‍वास

राज्यात काँग्रेससाठी चांगले वातावरण

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली: ‘‘राज्यात काँग्रेससाठी चांगले वातावरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार असावा, अशी स्थानिक नेतृत्वाची मागणी आहे. स्थानिकांच्या भेटीसाठी हिंगोलीत आलो आहे,’’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २२) येथील पत्रकार परिषदेत दिली.

चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यात काँग्रेससाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जागा वाढतील. मुंबई येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीतून हिंगोली लोकसभा काँग्रेसने लढवावी, अशी स्थानिक नेतृत्वाची मागणी समोर आली.

तसे वातावरणदेखील आहे. नुकत्याच कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश महाराष्ट्रातदेखील कायम राहणार आहे.’’ दरम्यान. जिल्ह्यात पक्षामध्ये असलेली गटबाजी दिसून आली. चव्हाण यांच्या समोरच घोषणाबाजी झाली. त्यामुळे जिल्ह्यात ‘काँग्रेस जोडो’ झाले नाहीच, अशी चर्चा रंगली आहे.

प्रत्येकाला ताकद वाढविण्याचा अधिकार

प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष जागेची मागणी करत आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल,’’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT