corona-patients 
महाराष्ट्र बातम्या

दिलासादायक...केवळ दोन टक्केच रुग्ण गंभीर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने साडेतीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मृतांचा आकडाही १२ हजारांवर गेला आहे. राज्यात सध्या १ लाख ४० हजार ९२ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी ९७ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे असून, त्यातील अनेक जण लक्षणविरहित आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण फक्त २ टक्के आहे आणि १ टक्के ‘आयसीयू’मध्ये उपचार घेत असून, त्यांना व्हेंटिलेटरवरवर ठेवण्यात आले आहे. 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक आहे. राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असून, महिलांचे कमी आहे. त्यामुळे पुरुषांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील पुरुषांमध्ये अधिक आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त असून महिलांमध्ये कमी आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३,४७,५०२ (२० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यातील ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. 

३१ ते ४० वयोगटाला धोका अधिक 
२१ ते ३०, ३१ ते ४० आणि ४० ते ५० या तीन वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक आहे. आतापर्यंत राज्यात ३१ ते ४० वयोगटातील ६६ हजार ८११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ ४० ते ५० वयोगटातील ५८ हजार ४६५, तर २१ ते ३० वयोगटातील ५७ हजार ७१२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

मुलांना सांभाळा
राज्यात ० ते १० वयोगटातील १२ हजार ५९१ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे प्रमाण ३.८६ टक्के एवढे असून, त्यातही आजारात गुंतागुंत वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत लहान मुलांमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. ११ ते २१ या वयोगटातील २२ हजार ३४५ मुला- मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत होती, त्यांचीच चाचणी केली जायची. आता सर्वांचीच चाचणी होत असल्याने ५० ते ६० टक्के बाधितांना लक्षणे नसल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढले असले तरी याचा फारसा परिणाम मृत्यूंमध्ये किंवा रुग्णालयांवर होणार नाही. फक्त त्यांच्याद्वारे दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना काही दिवसांसाठी क्वारंटाइन करून ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे संसर्ग रोखता येऊ शकतो.
- डॉ. अविनाश सुपे, कोरोना मृत्यू विश्‍लेषण समिती प्रमुख

(Edited by : Kalyan Bhalerao)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT