corona update sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

रुग्णसंख्येच्या निम्मे रुग्ण झाले बरे

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिर असून मृतांमध्ये किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर नव्या रुग्णांच्या तुलनेत निम्मे रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ४,१३० नवे रुग्ण आढळून आहे. तसेच २,५०६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, दिवसभरात कोरोनाच्या ६४ रुग्णांचा मृत्यू झाला, या आकड्यात कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. तसेच राज्यात सध्या ५२,०२५ अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर ६२,८८,८५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर १,३७,७०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईची कोरोना स्थिती अशी...

मुंबई शहरात दिवसभरात ४१६ नवे रुग्ण आढळून आले. तर ३८२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७,२३,८४० वर पोहोचली. तसेच मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९७ टक्के झालं आहे. तसेच शहरात सध्या ३,५६१ एकूण सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुपट्टीचा दर १,३७९ दिवस आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सच्या Playing XI मध्ये तिघांचे पदार्पण! जसप्रीतबाबत महत्त्वाचे अपडेट्स... सूर्यकुमार यादव ११ मधून बाहेर

महाराष्ट्रात आठवडाभर मुसळधार! ४ एप्रिलपर्यंत हवामान विभागानं दिला धोक्याचा इशारा

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात खरे मित्र; कधीच कुणाला देत नाहीत धोका, आयुष्यभर जपतात माणसं

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT