Crop Loans esakal
महाराष्ट्र बातम्या

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

सोलापूर जिल्ह्यातील बँकांनी जूनअखेर ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या एक हजार ३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे नवे-जुने केले आहे. यंदाच्या खरिपासाठी १७ हजार ८५१ शेतकऱ्यांना यंदा नव्याने पीक कर्ज मिळाले आहे. या शेतकऱ्यांना बँकांनी ४०९ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे यंदाच्या खरिपात चांगले पीक हातात येईल, असाच सुरवातीपासून अंदाज होता. वार्षिक पतपुरवठा आराखड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ लाख २७ हजार ३३२ शेतकऱ्यांना २ हजार ८५९ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. जूनअखेरपर्यंत यातील ५० टक्के कर्जाचे वाटप झाले. जिल्ह्यातील बँकांनी ८१ हजार ७०० शेतकऱ्यांना १ हजार ४४० कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

मेमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली, बँकांनी शेतकऱ्यांना मुबलक कर्जपुरवठा केला, असे सकारात्मक वातावरण असताना आता पावसाने दडी मारली आहे. जूनपासून पावसाने किरकोळ व हलक्या स्वरूपात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जूनमधील दोन नक्षत्रे व जुलैमधील सध्या सुरू असलेल्या पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. पेरण्या झाल्या आहेत, काही ठिकाणी पिकेही उगवली आहेत, परंतु पावसाने दांडी मारू लागल्याने आता दिवसेंदिवस चिंता व्यक्त होऊ लागली आहे. यंदाच्या खरिपात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जून अखेरपर्यंत ३१ हजार ९८५ शेतकऱ्यांना ४४१ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी व खासगी बँकानी ३१ हजार ३३८ शेतकऱ्यांना ७१३ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १८ हजार ३७७ शेतकऱ्यांना २८४ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज वाटपाच्या रक्कम उद्दिष्टाच्या पन्नास टक्के कामगिरी केली आहे. शेतकरी संख्येत मात्र बँका पिछाडीवर दिसत आहे. यंदाच्या खरिपात २ लाख २७ हजार ३३२ शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात मात्र ८१ हजार ७०० शेतकऱ्यांनाच मिळाले आहे. उद्दिष्टाच्या पन्नास टक्केही शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही.

एक हजार कोटींचे नवे-जुने

सोलापूर जिल्ह्यातील बँकांनी जूनअखेर ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या एक हजार ३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे नवे-जुने केले आहे. यंदाच्या खरिपासाठी १७ हजार ८५१ शेतकऱ्यांना यंदा नव्याने पीक कर्ज मिळाले आहे. या शेतकऱ्यांना बँकांनी ४०९ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदाच्या खरिपासाठी ३ हजार ७७ शेतकऱ्यांना २४ कोटी ४३ लाख रुपयांचा नव्याने पीक कर्ज दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांना अडचणीत आणायला जरांगेंना रसद पुरवताय का? शिंदे म्हणाले, मी लपून-छपून काही करत नाही

Chhagan Bhujbal : ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजन; जरांगेच्या मागणीला विरोध

राज्य सरकार घेणार ‘हे’ 2 मोठे निर्णय! 5 वर्षांत थकबाकीदार नसलेलाच यापुढे ग्रामपंचायत निवडणुकीस पात्र; ग्रामपंचायतीचा एकरकमी कर भरल्यास मिळणार 50 टक्के माफी

JP Nadda: गणेश उत्सवात शहराला भेट देणं माझं भाग्य, केंद्रीय मंत्री मुंबईतील गणरायाच्या चरणी नतमस्तक

Hotel Bhagyashree : जरांगेंचं आंदोलन सुरु असेपर्यंत हॉटेल भाग्यश्री बंद; आंदोलकांसाठी ट्रकभर शिधा मुंबईला पाठवला...

SCROLL FOR NEXT