अतिवृष्टीमुळे नुकसान  सकाळ
महाराष्ट्र बातम्या

अतिवृष्टीने १५ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! मदतीसाठी लवकरच पंचनामे

राज्यातील नांदेड, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूरसह एकूण २६ जिल्ह्यातील १४ लाख १८ हजार ३०३ हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे. तर ऑगस्टमधील पाच दिवसांतील अतिवृष्टीने ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील नांदेड, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, सोलापूरसह एकूण २६ जिल्ह्यातील १४ लाख १८ हजार ३०३ हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे. तर ऑगस्टमधील पाच दिवसांतील अतिवृष्टीने ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविला जाणार आ

राज्यात खरीप पिकांखाली १५० लाख हेक्टर क्षेत्र आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये बहुतेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टी समजली जाते. त्यानुसार राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, नगर, सोलापूर व ठाणे जिल्हे वगळता उर्वरित बहुतेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर, नगर जिल्ह्यात ४३३ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जिल्हानिहाय पंचनाम्याचे अहवाल मागविण्यात आले आहेत. नुकसानीचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागामार्फत तो अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नुकसानग्रस्तांना मदतीची घोषणा होईल. पण, अजूनही काही जिल्ह्यातील पंचनाम्याचे अहवाल मिळाले नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात होतो. परंतु, मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने त्यासंदर्भात काहीच हालचाली सुरु नसल्याचेही मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी यावेळी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच होटगी (ता. दक्षिण सोलापूर) व मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतीपिकांचेही अतिवृष्टीने नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

विदर्भात केंद्रीय पथकाकडून पाहणी


जुलै महिन्यात विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभीवर केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. आता कृषी विभागाने बागायती, जिरायती क्षेत्रावरील कोणत्या पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यात फळबागांचे क्षेत्र किती आहे, याची माहिती मागविली आहे. पण, राज्य सरकारकडून अद्याप नुकसानग्रस्तांना मदतीची घोषणा झालेली नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, परंतु, तशी परिस्थिती नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT