विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस (Devendra Fadnavis) यांनी विविध मुद्द्यांवरुन महाविकासआघाडी सरकारवर टिका केली आहे. युवा पिढीला बरबाद करण्याचे काम हे सरकार करत आहे. राज्यातील ही परिस्थिती पाहून मला झोप येत नाही. विविध सरकारी परीक्षांतील गोंधळ तसेच कुलगुरुंच्या (Vice-Chancellor) निवडीच्या कायद्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) युवांसाठी काहीतरी करतील असे मला वाटत होतं. परंतु त्यांनी निराश केल्याचंही फडणवीस यांनी म्हटले आहे.
छोट्यातल्या छोट्या पदांमध्येदेखील ज्या पद्धतीची टक्केवारी सुरू आहे, त्यावरून असे वाटते की त्यांच्या नेत्यांना जितके दिवस सरकार चालेल तितके दिवस खाऊन घ्यायचे. मंत्र्यापासून पदाधिकारी या भ्रष्टाचारामध्ये गुंतले आहेत. आपल्याला किती मिळेल यासाठी या तिघांचे भांडण सुरू आहेत. या कार्यपद्धतीमुळे नोकरशाही भ्रष्ट होत आहे याची भीती वाटत आहे' अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवीस यांनी केली.
आज युवांच्या बाबतीत अतिशय भयावह परिस्थिती सुरू आहे. युवा पीढीला बरबाद करण्याचे प्रकार सुरू आहेत. लाखो मुले परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. पण जेव्हा ही मुले परीक्षेला जातात तेव्हा त्यांना हे देखील माहीत नसतं की मंत्रालयात बसलेल्या नालायकाने पैसे घेतलेले असतात. सर्वच्या सर्व परीक्षा घेण्याची कामे न्यासाला दिली जातात. तसेच पैसे घेऊन जीए सॉफ्टवेअर कंपनीला यांनी पात्र केले, अशी टिका फडणवीसांनी केली. सत्तापक्षाचे कोण लोक होते की जे देशमुख यांच्यासोबत फिरायचे, असा सवालही फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
जे लिलावातून आले असतील ते कुलगुरू कसे काम करतील? विद्यापीठ हे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे काम होणार आहे. कुलगुरूंना बाबू बनवण्याचे काम यांनी केले आहे. कुलगुरूंचे सर्व अधिकार राज्य सरकारने आपल्या हातात घेतले आहेत. येत्या काळात कुलगुरूंचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यापीठ विधेयकाचा काळा कायदा या सरकारने पास केला. त्यामुळे आमची विद्यापीठे राजकारणांचा अड्डा झाल्याचं पहायला मिळेल.
आदित्य ठाकरे यांना विद्यार्थ्यांबद्दल काही वाटत असेल असे मला वाटले होते पण जो कायदा आणला ते पाहून मी निराश झालो. पिढ्या बरबाद करण्याचे काम हे सरकार करत असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपल्याला आज संघर्ष करावा लागणार आहे नाहीतर आपल्याला येणारी पुढी विचारेल जेव्हा कायदा बनत होता तेव्हा तुम्ही काय करत होता. इथे रोज भ्रष्टाचार पाहायला मिळेल. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरवले जाते पण या राज्य प्रतिगामी होत चालले आहे. मंत्र्यांच्या अधिकाराखाली महामंडळे तयार होतील ती आता उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बसणार, असंही फडणवीस म्हणाले.
जनतेचा विश्वास आजही आपल्यावर आहे. जनतेने तुम्हाला घरी बसवले होते मात्र तुम्ही त्यांच्याशी विश्वास घात करून सत्तेत आलात. हे सरकार भ्रष्टाचारी आहे. राज्याची सध्याची परिस्थिती पाहून मला झोप येत नाही. आपम या सरकारविरोधीत आपण लढले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.