मुंबई : ज्यावेळी मोठी नैसर्गिक आपत्ती (marathwada flood) येते. तेव्हा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला तातडीची मदत करण्याचा विचार करावा लागतो. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा. ठाकरे सरकारच्या (CM Uddhav Thackeray) सगळ्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. पंचनाम्याआधी मदत करा. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. जेव्हा राज्याचे प्रमुख किंवा मंत्री नैसर्गिक आपत्तीच्या पाहणीसाठी जातात. तेव्हा प्रशासन कामाला लागतो. मी आणि प्रवीण (pravin darekar) दरेकर उद्यापासून वाशिम पासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करतोय. आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात जाणार आहोत आणि परिस्थिती पाहून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
कुठल्याच गोष्टीची पूर्तता नाही; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
या पूर्वीचे नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही. जेवढ्या आपत्ती आल्या त्या संदर्भातल्या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. अगदी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ सर्व आपत्तीच्या वेळेला सरकार ने केलेल्या घोषणा पूर्ण झालेले नाहीत.
CBIच्या समन्सबाबत कुठलीही माहिती नाही
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना (CBI) ने समन्स बजावल्यावर पत्रकारांनी याबाबत फडणवीसांना विचारले असता, "मला यासंदर्भात कुठलीही माहिती नाही. माध्यमांच्या माध्यमातूनच अशी चर्चा ऐकली आहे.. मात्र अधिकारिक माहिती पोहोचलेली नाही. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे दोन्ही पद महत्त्वाचे पद आहेत... त्या संदर्भात असा स्पेक्युलेशन करून बोलणं योग्य होणार नाही" असे म्हणाले
परमवीर सिंग संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, मला कल्पना नाही असे सांगत फडणवीसांनी याबाबत बोलणे टाळले.
मुंबईचा सागरी हद्द आराखडा बाबत (कोस्टल डेव्हलपमेंट)
मला अतिशय आनंद होत आहे. आमचं सरकार असताना तो आराखडा मंजुरीसाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलं होतं. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करत होतो. हा आराखडा मंजूर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना चालना मिळणार आहे. खास करून सिडकोच्या एरियामध्ये अनेक प्रकल्पांना चालना मिळेल...असे फडणवीस म्हणाले
नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात.
नाना पटोले काहीही बोलतात... त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची गरज नाही... ते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात...अशी टिका फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.