Devendra Fadnavis, Sharad Pawar And Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: मराठा आरक्षण अन् जरांगे पाटलांबद्दल भाजप अधिवेशनात काय म्हणाले फडणवीस? पवार ठाकरेंनाही केला थेट सवाल

Manoj Jarange Patil: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या या अपयशात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील हे फॅक्टरही महत्त्वाचे ठरले होते.

आशुतोष मसगौंडे

पुण्यातील बालेवाडीत भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठा महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात तब्बल 5 हजार कार्यकर्त्यांना गृहमंत्री अमित शहांपासून देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य करत माजी कृषी मंत्री शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल करत, ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार आहेत का?

"जरांगे पाटील यांच्याबद्दल..."

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला जबरजस्त धक्का बसला आणि 30 जागा जिंकत महाविकास आघाडीने बाजी मारली. भाजप आणि महायुतीच्या या अपयशात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील हे फॅक्टरही महत्त्वाचे ठरले होते.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "मराठा आरक्षाच्या मुद्द्यावर बोलताना मी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काही बोलणार नाही. पण माझा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना सवाल आहे की, ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार आहेत का? त्यांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

"समाजत दुफळी..."

यावेळी राज्यातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीवर बोलताना फडणवीस म्हणाले, "सध्या समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काहींना वाटते असले प्रकार केल्यास निवडणुका जिंकता येतात यामुळे यात पेट्रोल टाकले जात आहे. निवडणुका येतील जातील पण कोणीही समाजात दुफळी निर्माण करू करण्याचे काम करू नका. कारण यामुळे समाज्यात पुन्हा एकोपा निर्माण होण्यासाठी तीन पिढ्या जाव्या लागतात."

फडणवीस यांनी आपल्या भाषणात माजी कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनाही सवाल केला. ते म्हमाले, "शरद पवार तब्बल चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि चे आतापर्यंत चार वेळा म्हणाले आहेत की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. पण आता ते म्हणत आहेत या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावे. मग त्यांनी ते मुख्यमंत्री असताना हा प्रश्न का सोडवला नाही."

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी काय काय केले याचा पाढाही वाचून दाखवला. ते म्हणाले, "आम्ही सरकारमध्ये असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला ते टिकवता आले नाही."

"आमच्या काळात आम्ही मराठा समाजाच्या तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी सारथी आणि आण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन केले. आज मराठा समाजातील असंख्य विद्यार्थी सारथी योजनेचा लाभ घेत आहेत. तर आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना उद्योजक बनवले आहे," असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT