PM Modi Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी...'; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा गौप्यस्फोट केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, असं म्हटलं आहे.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारावेळी वैयक्तिक टीका करणारी जी भाषा वापरतात. ती कीव करण्यासारखी आहे, असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली यावेळी त्यांनी अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले. उद्धव ठाकरे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही त्यांना काही बोलायचो नाही, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

उध्दव ठाकरे हे आमच्यासाठी वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र होते. काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही बोलायचो नाही. ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी श्रद्धेपोटी तसे वागायचो. खरे तर उध्दवजींना तर युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालांनंतर त्यांचे नाव पुढे येईना मुख्यमंत्रिपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. तसे पाहिले तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते. उद्धवजींना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचे वाटत असावे असे वाटते, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. पण २०१९ मध्ये त्यांनी वेगळी आघाडी केली. मी मनापासून सांगतो की, आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता. पण आमची चूक झाली.

"राज्यात युतीचं सरकार असून देखील मी मुख्यमंत्री झालो नाही, याचा मला धक्का बसला होता. नंतर लगेच मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागलो. संकटे, आव्हाने येत असतात. पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता. पक्षकार्यकर्ता म्हणून मी ते केले", असंही फडणवीसांनी पुढे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT