महाराष्ट्र बातम्या

Budget 2019 : अर्थसंकल्प शेतीसाठी केवळ बोलाची कढी- डॉ.अजित नवले

सकाळ वृत्तसेवा

अर्थसंकल्प 2019 :
मुंबई : शेती आणि ग्रामीण विकासाची केवळ भाषा करायची प्रत्यक्षात या क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिक तरतूद मात्र करायची नाही, याचा पुन्हा एकदा खेदजनक प्रत्यय केंद्रीय बजेटच्या निमित्ताने आला असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्यामुळे शेतीमालाचा उत्पादनखर्च आणखी वाढणार आहे. शेतीमालाच्या आधारभावात अत्यन्त तुटपुंजी वाढ करून सरकारने अगोदरच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला होता. आता आधार भावात शेतीमाल खरेदी करण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद न केल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहणार असल्याचेही नवले म्हटले आहे.

व्यापाऱ्यांना पेंशन योजना जाहीर केली जात असताना जाहीरनाम्यात आश्वासन दिले गेले असतानाही शेतकरी पेंशन बाबत मात्र नकारघंटा वाजवण्यात आली आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा व्यक्त करताना सिंचन, रोजगार, ग्रामीण आरोग्य, विमा, गोदामे, बाजार सुधारणा याबाबत मात्र पुरेशी तरतूद करण्यात आलेली नाही. एकंदरीत मांडण्यात आलेला अर्थसंकल्प शेती  व ग्रामीण भागासाठी बोलाचा भात बोलाची कढी असाच आहे. केवळ बोलाचा कढीने विकासाची भूक भागणार नाही हे वास्तव असल्याचे नवले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Laxman Hake : सुनेत्रावहिनींना विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा; बारामतीची निवडणूक आम्ही ठामपणे लढविणार...

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

हा राया नाहीतर भलताच ! मालिकेतून 4 कलाकार बाहेर पडल्यानंतर आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक चक्रावले

दोन बहिणी, दोन मालिका, झी मराठीच्या 'या' नायिका आहेत सख्ख्या बहिणी; गाजवतायत टीव्ही इंडस्ट्री, तुम्ही ओळखल्या का?

SCROLL FOR NEXT