NCP Crisis 
महाराष्ट्र बातम्या

"राष्ट्रवादी प्रकरणी EC ला कार्यवाहीच करता येत नाही"; अनुच्छेद १५ चा दाखला देत मनु सिंघवींनी मांडले ५ महत्वाचे मुद्दे

Sandip Kapde

NCP Crisis: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपली आहे. आज शरद पवार गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. अजित पवार गटाने पक्षावर ताबा मिळवण्यासाठी कट रचल्याचे कामत म्हणाले. सुनावणी संपल्यानंतर वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ५ मुद्दे मांडले.

  • अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, देवदत्त कामत यांनी सांगितले की विचित्र घटना घडत आहेत. १९९९ पासून एक पक्ष निर्माण केला, विस्तार झाला तो फक्त शरद पवार यांच्यामुळे. यांना सर्वांना सहमतीने अध्यक्ष स्विकारले. कधीही कोणताही आरोप २० वर्षात झाला नाही.

  • मात्र पहिल्यांदा २०२३ मध्ये आरोप लावण्यात आले की २०१८ मध्ये झालेली निवडणूक चुकीची होती. राष्ट्रीय स्तरावर २०२०,२०२१, २०२२ मध्ये झालेली निवडणूक चुकीची होती. राष्ट्रीय कार्यकारणी चुकीची आहे.

  • अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी हा आरोप केला आहे. मात्र राष्ट्रीय कार्यकारणीला बोलवण्याची प्रक्रिया प्रफुल्ल पटेल यांच्या पत्राने झाली. त्यांची सही पत्रावर आहे. निवडणुका होतात तेव्हा शरद पवारांना अजित पवार अध्यक्ष मानत होते. त्यांना प्रमोट करत होते. शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत, मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल त्यांचे समर्थ करतो. असे अनेका कागदपत्रे निवडणूक आयोगाला १० वेळा दाखवण्यात आले असल्याचे सिंघवी म्हणाले.

  • अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ३० जून २०२३ ला पक्षात फुट पडली, पक्षाचे चिन्हाबात कुठलाही मुद्दा उपस्थित नाही होऊ शकत. कारण चिन्हाच्या बाबात आधीपासून वाद पाहीजे की खरी राष्ट्रवादी कुणाची?. ३० तारखेपूर्वी अजित पवार गटाने हा मुद्दा कधीच उपस्थित केला नाही. त्याचे पुरावे देखील आहेत. मात्र याचिका दाखल केली त्यावेळी कोणताच वाद देखील नव्हता. जर वाद नव्हता. तर पक्षा फुट पडल्याचा मुद्दा कुठून येतो. निवडणूक आयोगाला अधिकारक्षेत्र कसे मिळते. निवडणूक आयोग अनुच्छेद १५ अंतर्गत कार्यवाही सरु कशी करु शकते. जर की पूर्वीपासून कोणताही वाद नव्हता.

  • निवडणूक आयोगाने यापूर्वी अनेक निकाल दिले आहेत. अनुच्छेद १५  अंतर्गत पूर्वीपासून वाद पाहीजे. एक याचिका दाखल करुन कोणताही वाद निर्माण करता येत नाही. याच  (अजित पवार गट) लोकांनी शरद पवार यांना अध्यक्ष नेमलं आहे. यानींच बैठका बोलावल्या आता हे आक्षेप घेत आहेत. आता ते अविश्वास असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हे खोटं आम्ही महाराष्ट्रासमोर आणू, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT