Jitendra Awhad
Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

रुपेश नामदास

Jitendra Awhad: रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "आव्हाड यांनी राजीनामा दिली की, नाही मला महित नाही, मात्र महिलेने जी तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्याची चौकशी पोलिस करतील आणि त्यामध्ये जे काय समोर येईल त्यावर पोलिस कारवाई करतील, आमचे सरकार कोणत्याही राजकीय सूड भावनेतून कोणतीही कारवाई करत नाही, हे राज्य कायद्याचं आहे, आणि कायद्याने चालतं." असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषेदेत सांगितल की, मी सगळं सहन करेन पण ३५४ (विनयभंग) मान्य करणार नाही. ३५४ आणि ३७६ यासाठी माझा जन्म नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता पण हे मला सहन होत नाही, अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT