Elections due to time pass by the government Elections due to time pass by the government
महाराष्ट्र बातम्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने योग्य भूमिका कधी मांडलीच नाही

सकाळ डिजिटल टीम

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकासआघाडी सरकारने निव्वळ टाईमपास केला. ट्रिपल टेस्ट केली नाही. त्यामुळे सर्वोच न्यायालयाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) घ्या असा आदेश द्यावा लागला. ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी केला. (Elections due to time pass by the government)

तत्काळ निवडणुका (Election) घ्या असे न्यायालयाने सांगणे हे शंभर टक्के सरकारचे अपयश आहे. सरकार ट्रिपल टेस्ट पूर्ण करीत नाही. किती दिवस थांबायचे हाही प्रश्नच आहे. सरकारने नवीन कायदा केला तो अमलात आणला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी झाली आहे. यास सर्वस्वी सरकारच (government) जबाबदार आहे. सरकारने योग्य भूमिका कधी मांडलीच नाही. योग्य प्रकारे कार्यवाही केली नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे समजून घेऊ आणि पुढील भूमिका मांडू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ढाचा पाडल्याचा अभिमानच

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले जे मर्सीडीज बेबी आहेत ते कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा उडवू शकतात. परंतु, कितीही थट्टा उडवली तरी आमच्यासारख्या लाखो कारसेवकांना मशिदीचा ढाचा पाडल्याचा गर्व आहे. त्यावेळी मी स्वतः तेथे होतो आणि नगरसेवक होतो, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT