nitin raut sakal media
महाराष्ट्र बातम्या

वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल - नितिन राऊत

सकाळ डिजिटल टीम

राऊत म्हणाले की, आधीच्या सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवून ठेवला. आता कोरोना, अतिवृष्टी या परिस्थितीमुळे वसुली करता आली नाही.

मुंबई - राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबीलाची थकबाकी वसूल झाली नाही तर राज्य अंधारात जाईल असा गंभीर इशारा दिला आहे. वीजबीलाची थकबाकी ही ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यासंदर्भात महावितरणचं प्रेझेंटेशन सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. यामध्ये आधीच्या सरकारने बाकी ठेवलेली वसुलीबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यावर उपाय व योजना काय करता येतील याबाबत अहवाल तयार करण्यास सांगितलं असल्याची माहिती नितिन राऊत यांनी दिली.

थकबाकी आणि वसुलीचा अहवाल हा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. तसंच थकबाकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर राज्य अंधारात जाईल अशा इशाराही नितिन राऊत यांनी दिला. उर्जा विभागातील मोठी वसुली अद्याप रखडली असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारच्या कार्यकाळात थकीत असलेली बिले आता कॅरीफॉरवर्ड झाली असल्याचं नितिन राऊत यांनी सांगितलं. राऊत म्हणाले की, आधीच्या सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवून ठेवला. आता कोरोना, अतिवृष्टी या परिस्थितीमुळे वसुली करता आली नाही. त्यामुळे भार अधिक वाढला आहे. महावितरण आर्थिक दृष्ट्या नफ्यात येईल, यावर विचार करण्याची गरज आहे असे नितिन राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT