Raju Shetti and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetti : साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी समितीतून वगळले; राजू शेट्टी यांची सरकारवर टीका

रवींद्र देशमुख

कोल्हापूर - राज्याच्या ऊस दर नियंत्रण समितीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी नेत्यांना वगळण्यात आले आहे. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा मुद्दा चर्चेत असतानाच शेट्टी यांना वगळण्यात आले.

राजू शेट्टी म्हणाले की, ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करा यासाठी आम्ही सरकारकडे एक वर्षं पाठपुरावा केला. अनेकवेळा आंदोलनेही केली. ही समिती अस्तित्वात नसल्यामुळेच, एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची क्षमता असून सुद्धा अनेक कारखान्यांकडून मागील वर्षातील अंतिम बिलं मिळाली नाहीत. कारण त्यांचा हिशोब करणारी ऊस दर नियंत्रण समिती अस्तित्वात नव्हती. यावर्षी हंगाम समाप्त होऊन दुसरा हंगाम तोंडावर आला, तरी समिती अस्तित्वात नव्हती.

दरम्यान यावर्षी अनेक कारखान्यांकडे एफआरपी देऊन ऊसाचे पैसे शिल्लक राहिले आहेत. कारण साखरेला भाव आणि इथेनॉलमधून उत्पन्न मिळाले आहे. अशा परिस्थितीत कारखान्यांवर अंकुश ठेवून त्यांचा हिशोब तपासून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी सक्षम ऊस दर नियंत्रण समितीची आवश्यकता होती.

दुर्दैवाने कागदी घोडे नाचवून अत्यंत दुबळी अशी ऊस दर नियंत्रण समिती निर्माण केली आहे. ज्या समितीमध्ये मी, रघुनाथ पाटील, विक्रमसिंह घाडगे, बी.बी. ठोंबरे यांच्यासारखे एकपेक्षा एक दिग्गज आम्ही काम करत होतो. मात्र आता दुबळ्या समितीची निर्मिती करून सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचं शेट्टी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT