Kisan-Long-March 
महाराष्ट्र बातम्या

शेतकरी पुन्हा काढणार ‘किसान लाँग मार्च’

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत आहे, परिणामी पाणी, चाराटंचाई, वाढते कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात, जनावरांना दावणीवर चारा द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत.

राज्यभरातील शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान जाहीर केले; मात्र अजूनही शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ही योजना शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपन्यासाठी सुरू केल्याचे ॲड. भोजने यांनी नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT