Kisan-Long-March
Kisan-Long-March 
महाराष्ट्र

शेतकरी पुन्हा काढणार ‘किसान लाँग मार्च’

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत आहे, परिणामी पाणी, चाराटंचाई, वाढते कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात, जनावरांना दावणीवर चारा द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत.

राज्यभरातील शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान जाहीर केले; मात्र अजूनही शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ही योजना शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपन्यासाठी सुरू केल्याचे ॲड. भोजने यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT