Mahavitaran esakal
महाराष्ट्र बातम्या

Electricity: वापर वीतभर बिल हाथभर ; शेतकऱ्यांला आले १ लाख २९ हजाराचे विज-बिल

सकाळ डिजिटल टीम

वाडा तालुक्यातील म्हसरोली येथील शेतकऱ्याने वीज चोरी केल्याच्या संशयातून एक लाख ३० हजारांचे देयक महावितरणकडून पाठवण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्याने कोणतीही वीज चोरी न केल्याचा दावा करत कंपनीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.

म्हसरोली येथील अजित वामन पाटील यांनी वीज चोरी केल्याच्या आरोपातून एक लाख २९ हजारांचे वीज देयक आकारण्यात आले आहे. वीज वाहिनीवरून कोणत्याही प्रकारे वीज चोरी केली नाही अथवा वीज वाहिन्यांसोबत कोणतीही छेडछाड केली नाही.

अंगणात असलेल्या वायरचे फोटो काढून चुकीचे देयक आकारत कारवाई करण्यात आली. आपले कुटुंब हे शेतकरी असल्याने उदरनिर्वाह शेतीच्या उत्पन्नावर चालतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील देयक मी भरू शकत नाही.

शेतीतून मिळणारे उत्पन्न अल्प असल्याने वाढीव देयकाबाबत माझे कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याचे शेतकरी पाटील यांनी सांगितले. याबाबत त्यांनी वाडा कार्यालयातील उप अभियंता यांना निवेदन देत कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

वीजचोरी केली नसताना महावितरणने चुकीचे देयक पाठवले आहे. माझे उत्पन्न शेतीवर आधारित असल्याने वीज देयक भरू शकत नसल्याचे व महावितरणने चुकीची कारवाई केल्याबाबत कंपनीला निवेदन देऊन कळवले आहे.

- अजित वामन पाटील, ग्राहक, म्हसरोली

संबंधित शेतकऱ्याला आलेल्या वीज देयकाची शहानिशा करून मगच त्यावर तोडगा काढता येईल.

- अविनाश कटकवार, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, वाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT