Naseem khan sakal media
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांचा अपमान विसरणार नाही; काँग्रेसच्या नसीम खान यांची टीका

- कृष्ण जोशी

मुंबई : कृषी कायदे (farmers law) मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर (Delhi border) आंदोलन (farmers strike) करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही, खलिस्तानी, नक्षलवादी (Naxalite) संबोधण्यात आले. त्यांचा हा अपमान देशातील जनता कधीही विसरणार नाही, अशी टीका राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem khan) यांनी आज येथे केली.

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर तसेच मुंबईतही ‘किसान विजय दिवस’ साजरा केला. पंतप्रधानांनी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करुनही जोपर्यंत संसदेत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीच. पंतप्रधानांनी शेतकरी व जनतेचा विश्वास गमावल्याचेच हे द्योतक आहे, असेही खान यांनी टिळक भवन येथील कार्यक्रमात सांगितले.

पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांनी, हे कायदे सरकारला मागे घ्यावे लागतील अशी परखड भूमिका मांडली होती. राहुल गांधी यांचे आधीच ऐकले असते तर सातशे शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला नसता, असेही खान यांनी दाखवून दिले. नोटबंदी, कृषीकायदे आदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले सर्व निर्णय देशाला खड्यात घालणारे निघाले. भाजपाचा हा अहंकार देशातील जनतेच्या मुळावर उठला असून त्यात नुकसान जनतेचे होत आहे, असाही आरोप नसीम खान यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणुकीनंतर २४ दिवसांत महागाईचा नवा धक्का! पेट्रोल, डिझेल ते खाद्यतेलापर्यंत किमती कशा वाढल्या? अजून किती वाढ बाकी?

स्टार प्रवाहच्या 'सुना येती घरा'ची वेळ ठरली ठरली; तेजश्री प्रधानच्या मालिकेला देणार टक्कर; कोणती मालिका घेणार निरोप?

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT