bharne mama 
महाराष्ट्र बातम्या

अगोदर कोरोनाला घालवतो मग राष्ट्रवादीतील नाराजी दूर करतो 

प्रमोद बोडके

सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार आहे. राज्यातील सरकारप्रमाणेच जिल्ह्यात काम करतानाही आम्ही एकत्रित मिळून काम करत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मी सर्वांचे फोन घेतो, बैठकीत असल्यावर कसा फोन घेणार?, बैठक संपल्यानंतर मी त्या व्यक्तींना परत फोन करत असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज दिली.

सध्या कोरोनाचे संकट महत्त्वाचे आहे. हे संकट अगोदर संपवू त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतील नाराज मंडळींचा गैरसमज दूर करू असा विश्‍वास पालकमंत्री भरणे यांनी आज व्यक्त केला. कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरोपावर उत्तर देताना पालकमंत्री भरणे म्हणाले, पक्षाध्यक्ष पवार आणि सोलापूर हे नाते जिव्हाळ्याचे आहे. सोलापूरचे आपण काही तरी देणे लागत असल्याने पवार यांनी सोलापुरातील कोरोना स्थितीची आढावा बैठक घेतली. या दौऱ्यात फक्त लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी यांनाच बोलविण्यात आले होते. इतर कोणालाही या दौऱ्यात आपण भेटणार नसल्याचे पक्षाध्यक्ष पवार यांनी सांगितले होते. त्यानुसारच आपण मोजक्‍या व्यक्तींना निरोप दिल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. सोलापुरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा संकट दूर झाल्यानंतर या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचा गैरसमज आपण दूर करणार असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT