पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) नुकतीच ६५० फौजदारपदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, २०१८ मध्ये ३८७ फौजदारपदांची भरतीप्रक्रिया सुरू होऊनही ‘एमपीएससी’च्या ढिसाळ कारभारामुळे अद्याप अंतिम निकाल लागलेला नाही, त्यामुळे जुन्या निकालाची वाट पाहायची की पुन्हा तयारीला लागायचे, असा संभ्रम उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे.
‘एमपीएससी’तर्फे ३ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहिरात देण्यात आली होती, त्यामध्ये अराजपत्रित अधिकारी गट ब, राज्य कर निरीक्षक आणि फौजदारपदाची भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले. या पदांसाठी १३ मे २०१८ रोजी पूर्वपरीक्षा राज्यभरात घेण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०१८ व सप्टेंबर २०१८ या दोन टप्प्यांत मुख्य परीक्षा घेण्यात आली. जवळपास वर्षभराने ऑक्टोबर २०१९ मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यानंतर लगेच निर्णय लागेल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. शारीरिक चाचणी होऊन चार महिने होऊन गेले तरी ‘एमपीएससी’ने अंतिम निकाल जाहीर केलेला नाही.
दरम्यान, ‘एमपीएससी’ने नुकतीच ६५० पदांची भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. २०१८च्या भरतीमध्ये शारीरिक चाचणीत पात्र होऊन, मुलाखती दिलेल्या उमेदवारांना मात्र, त्यांचा निकाल काय लागणार हे माहिती नाही, त्यामुळे पुन्हा २०२०च्या भरतीची तयारी करावी की नाही असा संभ्रम या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. या संदर्भात ‘एमपीएससी’चे अध्यक्ष सतीश गवळी यांच्याशी संपर्क साधला; पण होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.