web.jpg
web.jpg 
महाराष्ट्र

फडणवीस आक्रमक; पहिल्याच दिवशी ट्विट करत सोडले ठाकरे सरकारवर बाण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः गुरुवारी सांयकाळी  उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय पर्वाला सुरूवात झाली. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांमध्येच कॅबिनेटची बैठक घेतली. याच बैठकीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरती टीका केली आहे.  

त्यांनी केलेल्या व्टिटमध्ये ते म्हणाले की, ''काल झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली.'' 

मग बहुमताचे दावे कशासाठी- फडणवीस यांनी अनेक प्रश्न देखील यावेळी उपस्थित केले आहेत, ‪या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‬नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? ‬ ‪स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? ‬ अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?‬ ‪भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?  अशा प्रकारचे सवाल फडणवीस यांनी केले.‬

दरम्यान, अशा प्रकारची टीका करून फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून लगेचच ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. ‬

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT