Gatari Party: गटारीची पार्टी जीवावर बेतली; चारचाकी वाहून गेल्याने एकाचा मृत्यू! sakal
महाराष्ट्र बातम्या

Gatari Party: गटारीची पार्टी जीवावर बेतली; चारचाकी वाहून गेल्याने एकाचा मृत्यू!

Kalyan Latest Update: निसर्गाच्या सानिध्यात तालुक्यात ठीकठिकाणी पार्टीसाठी आले असल्याचे दिसून येत आहे.

नरेश जाधव

Thane Latest Update| निसर्गाच्या सानिध्यात पार्टीला जाणं मित्रांना चांगलंच महागात पडलंय. तानसा धरणाच्या खाली एका पार्टीला पाच मित्र गेले होते. धरणाच्या गेटजवळ पार्टी करताना पाच मित्र तानसा नदीत कारसह वाहून गेले.

त्यातील चौघांनी कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र कारमध्ये एक जण अडकला होता पण तात्काळ मदत न मिळाल्याने त्याचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला होता त्याचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला होता. याप्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गटारी साजरी करण्यासाठी कल्याणहून पाच मित्र कारने आले होते, तानसा धरणाच्या गेटखाली कारमध्ये बसून ते पार्टी करत असतांना तानसा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. त्यात ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील चौघांनी कार बाहेर उड्या मारल्यानं त्यांचा जीव वाचला.

मात्र, दोन मित्र गाडीतच अडकले. या पैकी गणपत चिमाजी शेलकंदे यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला. मात्र, एकजण आद्याप बेपत्ता आहे. त्यांचा देखील शोध सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिलीय.

पावसाळ्यात धरण, तलाव, नदी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना पिकनीकसाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून 31 ऑगस्ट पर्यंत बंदी घातली आहे. तरीसुद्धा काही पर्यटक जीव धोक्यात घालून अशा निसर्गाच्या सानिध्यात तालुक्यात ठीकठिकाणी पार्टीसाठी आले असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे गेल्या 10/12 दिवसापासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणातून पाण्याचा विर्सग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

यामुळं तालुक्यातील नदी काठच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलाय.मुंबई, नासिक,कल्याण येथून येणारे अतिउत्साही पर्यटक मात्र, स्वतःचा जीव धोक्यात घालून मजा लुटत असल्याचे भर पावसात दिसत आहेत.

धरणे रस्त्याच्या कडेला किंवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या प्रवाहा समोरच गावाला जोडणारे रस्ते असल्याने स्थानिक गावकऱ्यांनाही जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.धरणाच्या ठिकाणी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धारणालगत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT