girish mahajan 
महाराष्ट्र बातम्या

एका ओळीचा काय? आम्ही पानभर अध्यादेश काढू, पण...; मराठा-कुणबी मुद्दावर महाजन यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दावर जालना जिल्ह्यात सुरू असलेलं आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र सरकार मुळ मागणीसाठी वेळ लागत असल्याचं सांगत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील अध्यादेशावर ठाम आहेत. या अध्यादेशाबाबत सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एका ओळीचा अध्यादेश काय आम्ही पानभर अध्यादेश काढू. अध्यादेश हा विषय असा नाही की कॅबिनेट बैठक घेतली आणि विषय संपेल. मराठा आरक्षणासाठी आपण किती वर्षांपासून लढतोय आणि हे करताना आमच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळेस कसरत करुन आम्ही आरक्षण कोर्टात टिकवलं.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण टिकू शकलं नाही. हे सांगण्याचं तात्पर्य आहे की या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक, पॉझिटिव्ह आहे. मराठा समाजाची जी मागणी आहे, त्याला आमचं सरकारच न्याय देईल, असंही महाजन यांनी म्हटलं.

दरम्यान समिती नेमून तीन महिने झाले आहे. आणखी थोडा वेळ लागतोय. मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. तरुणांना न्याय मिळणार आहे. मला वाटतं तीन महिने झाले म्हणून सर्व संपलेलं नाही. एक महिन्याची मुदत मुख्यमंत्र्यांनी आणि समितीने मागितली आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याचं महाजन यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

SCROLL FOR NEXT