Kishor-Tiwari
Kishor-Tiwari 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनाही पॅकेज द्या! - किशोर तिवारी

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - भारत सरकारने गरिबांना, उद्योगांना, तसेच बॅंकांना सुमारे ४ लाख कोटींचे पॅकेज दिले. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला कमीत कमी चार लाख कोटींचे पॅकेज द्यावे. भारतातील ७० टक्के अन्नसुरक्षा पूर्ण करणाऱ्या खरीप हंगामासाठी एकात्मिक कार्यक्रम आखून मार्ग काढावा, अशी विनंती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी केली.

शेतकरी व शेतमजूर पंतप्रधान व मुख्यमंत्रांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहेत. मात्र घरात पडलेला कापूस, शेतात उभे असलेले पीक, संत्रा, फळबागा, भाजीपाला याचे होत असलेले अपरिमित नुकसानीसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची गरज असल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे.

लॉकडाऊनच्या परिणामामुळे बागायती आणि भाजीपाला क्षेत्रातील प्रचंड नुकसान झाले आहे. पुरवठा साखळीत पूर्ण व्यत्यय व खरेदी केंद्रे व कृषी प्रक्रिया युनिट बंद असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगामी खरीप हंगामाच्या संपूर्ण परिणामाच्या गंभीर चिंतेवरही तिवारी यांनी प्रकाश टाकला आहे. भारतातील ७० टक्के अन्नपुरवठा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न खरीप हंगामावर अवलंबून असून, मार्च ते मे या कालावधीत खरीप बियाणे, खते, कीटकनाशके तयार करण्याचा निर्णायक काळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT