महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या आक्षेपानंतरही राज्यपाल मराठवाड्याच्या दौऱ्यावर

सकाळ वत्तसेवा

परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरुवारी (ता. ५) ते शनिवार (ता. ७) या कालावधीत नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यांवर आहेत. जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठका घेणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट देणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुंबई येथून गुरुवारी (ता. ५) सकाळी १० वाजता नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे.

तीन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण उपक्रम, वनस्पतीशास्त्र आणि जैवविविधता उद्यान या ठिकाणी भेटी देणार आहेत. तख्त सचखंड श्री हुजूर साहीब प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनसोबत आढावा बैठक घेणार आहेत. नांदेड येथे मुक्कामी राहणार आहेत. शुक्रवारी (ता.६) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील. कोश्यारी यांचे शुक्रवारी (ता. ६) दुपारी साडेतीन वाजता परभणी येथे आगमन होणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील. रात्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वैज्ञानिक भवन येथे मुक्कामी राहतील.

कोश्यारी शनिवारी (ता. ७) सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बांबू संशोधन प्रात्यक्षिक, राष्ट्रीय उच्च कृषी शिक्षण प्रकल्प (नाहेप) अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, विद्यापीठ ग्रंथालय, या ठिकाणी भेटी देणार आहेत. कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये विविध उपक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. तरुण उद्योजक, विद्यार्थी, शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत.

.. नेमका आक्षेप ...

नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने मुला मुलींसाठी दोन हॉस्टेल बांधली आहेत. हे बांधकाम पूर्ण झाले असून अद्याप ते विद्यापीठाकडे वर्ग केलेले नाही. त्याचे उद्‍घाटन करून नंतर विद्यापीठाकडे देणे हा अधिकार राज्यसरकारचा आहे. राज्यपाल कुलपती असल्याने विद्यापीठ व्यवस्थापनाचा त्यांचा अधिकार आहे. पण, सरकारने केलेली कामे अल्पसंख्याक विभागाला अथवा सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही, असा मुद्दा नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळात उपस्थित केला. शिवाय, नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत ते आढावा बैठक घेणार आहेत. हिंगोलीत कोणतेही विद्यापीठ नसताना तिथेही ६ ऑगस्टला आढावा बैठक घेणार आहेत. तर ७ ऑगस्टला परभणीत कृषी विद्यापीठात कार्यक्रम घेणार आहेत, तो त्यांचा अधिकार आहे परंतु तिथेही अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. विद्यापीठ प्रशासनासोबत त्यांनी जरूर आढावा बैठका घ्यावात पण जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका म्हणजे सरकारच्या अधिकारावर गदा आणणे असल्याची नाराजी अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली. याअगोदरही राज्यपालांनी कोविड काळात आढावा घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी केंद्रात तक्रार झाल्यावर ते थांबले होते. परंतु पुन्हा त्यांनी तेच सुरू केले आहे हे योग्य नाही असे नवाब मलिक म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT