मुंबई : ''मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. सरकारने कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण द्यावे, असा निर्णय घेतला. तोडगा काढण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. यासंदर्भात मान्यवरांकडून अनेक सूचना आल्या. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे'', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले. तसेच आंदोलकांनी आंदोलनादरम्यान हिंसा, आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी आज बैठक पार पडली. या बैठकीसाठी समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ''राज्य सरकारने कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण द्यावे, असा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनादरम्यान जमावाने कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये. तसेच कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत मान्यवरांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यातील विविध भागात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जमावाकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्याही केल्या होत्या. त्यानंतर आता या आरक्षणप्रश्नी आज बैठक घेण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.