mantralaya
mantralaya 
महाराष्ट्र

सरकारच्या अस्थिरतेची मंत्रालयात चर्चा 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - शिवसेना-भाजपची युती तुटल्याचे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना मध्यावधी निवडणुकीची शक्‍यता वर्तवली आहे. पवार यांच्या वक्‍तव्याचे पडसाद सरकारच्या स्थिरतेवर पडले आहेत. सरकार डळमळीत होणार का? याची चर्चा सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री आस्थापनेवरील "ओएसडी', खासगी सचिव यांच्यात रंगली आहे. 

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना भाजपसोबत युती करणार नाही, असे जाहीर केले. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी मध्यावधी निवडणुका होणार, असे भाकीत केले. त्यामुळे शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार, केव्हा बाहेर पडणार, सरकार अल्पमतात येणार का? तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जाणार का? असे अनेक सवाल सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मंत्री आस्थापनावरील अधिकारी- कर्मचारी सध्या विचारत आहेत. त्यातच शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी "बॅगा भरून तयार आहे. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो,' अशा आशयाची जाहीर विधाने केली. त्यामुळे या चर्चेत आणखीन भर पडत आहे. 
शिवसेना तसेच भाजप मंत्र्यांच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी त्यांच्या मूळ विभागात रिक्‍त जागांची सामान्य प्रशासन विभागाकडे चौकशी करीत आहेत. भाजपच्या एका मंत्र्याचे खासगी सचिव म्हणाले, की मुंबई महापालिकेत जिंकल्यावर दबाव वाढल्याने शिवसेना स्वतः बाहेर पडेल तर हरल्यावर भाजपच शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवेल. त्यामुळे काहीही झाले तरी सरकार अस्थिर होणार आहे. परिणामी आम्हाला मूळ विभागात जाण्याचा विचार करावाच लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT