महाराष्ट्र बातम्या

Grampanchayat Result: राज्यातील 1079 गावांचा 'कारभारी' आज ठरणार

दत्ता लवांडे

मुंबई : गावकीच्या राजकारणातील आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. राज्यातील जवळपास १०७९ ग्रामपंचायतींचा कारभारी आज ठरणार असून प्रतिष्ठितांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर एकूण ८७ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंचाची निवड झाली आहे. तर या निवडणुकीत कुणाचा गुलाल असेल हे पाहणे गरजेचे आहे.

(Gram Panchayat Election Result Latest Updates)

राज्यातील १८ जिल्ह्यातील ११६५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यासाठी काल मतदान पार पडले असून ८६ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडला गेला. तर उरलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. तर यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, शिवसेनच्या दोन्ही गटाच्या नाव आणि चिन्हाच्या बदलानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड

थेट जनतेतून सरपंच निवडीचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर आता या निर्णयानुसार या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT