उष्णतेची लाट
उष्णतेची लाट esakal
महाराष्ट्र

मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांत येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. येत्या १६ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. (Heat wave in Mumbai and adjoining districts warning by IMD)

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १६ मार्चपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी बचावात्मक उपाययोजना करुन काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

उत्तर-पश्चिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यानं समुद्रावरुन वाहणारे वारे वाहण्यास उशीर होत आहे. त्याचबरोबर सध्या आकाश निरभ्र आहे. हवामानाची ही परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातील किनारी जिल्ह्यांना जसे रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला तीन दिवसांसाठी १४, १५ आणि १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, उन्हात जाणं टाळावं, सैल आणि सुती कपडे वापरावेत आणि भरपूर पाणी प्यावं असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT