Maharashtra Rain Update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : राज्यामध्ये सर्वदूर संततधार पाऊस;कोकणात जोरदार, विदर्भात पूरस्थिती,मराठवाड्यात पुनरागमन

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील १२४ मंडळांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून २७ मार्ग बंद आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील १२४ मंडळांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून २७ मार्ग बंद आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून गोंदिया जिल्ह्यात कान्होलीचा झरी तलाव फुटल्याने ८० एकरातील धान पीक पाण्याखाली गेले. आज सकाळी हा तलाव फुटला. अकोल्यात जोरदार पाऊस पडू लागला असून वाशीममध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांतील धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत काही मंडळांत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. तर अनेक ओढे, नाल्यातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात रिपरिप सुरू आहे. नाशिक, पुणे, सोलापूर भागांतही सरी कोसळत आहे.

सांगलीतील शिराळा तालुक्यात जोर कायम आहे. खानदेशातही धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत काही भागात हलक्या सरी पडल्या. कोल्हापूर, सांगलीत रविवारच्या तुलनेत सोमवारी (ता. २२) जोर काहीसा मंदावला आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. या भागातील जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. सध्या तुरळक सरीमुळे पिकांना दिलासा मिळत आहे.

कोकणात मुसळधार

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पाऊस ओसरला असला तरी रविवारी खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. तेरेखोल, सुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. काही मार्गांवरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, जिल्ह्याच्या सर्व भागांत सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली होती. रत्नागिरीत भातशेती पाण्याखाली गेली आहे. धरणांची पातळी ८० टक्क्यांवर पोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT