paddy cultivation
paddy cultivation 
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर; भात लागवडीच्या कामांना वेग

सकाळवृत्तसेवा

पुणे - मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी मारलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे भातलागवडीच्या कामांना वेग येणार आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यातील हतनूर आणि बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.     

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे सर्वाधिक १९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना पुन्हा आरंभ झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोरी व हतनूर प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातील आवक  वाढली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा
आज कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारी (ता. ४) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT