accident
accident SAKAL
महाराष्ट्र

अपघातानंतर जखमींना करा मदत! पोलिस चौकशीला बोलावणार नाहीत

तात्या लांडगे

सोलापूर : महामार्गांवरील अपघातातील जखमींना इतर वाहनचालकांनी तथा नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी मदत करावी. त्या मदत करणाऱ्या व्यक्तीला पोलिस चौकशीला बोलावणार नाहीत, असे स्पष्टीकरण ग्रामीण पोलिसांनी दिले आहे. अपघात झाल्यानंतर विलंबाने मदत मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

वाहनचालकांचा प्रवास वेगवान व्हावा म्हणून महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढविली जात आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालय व राज्यातील ‘एमएसआरडीसी’कडून दोन ते अडीच लाख कोटी रुपयांचे रस्ते तयार केले जात आहेत. रस्ता तयार करताना वाहनचालकांसाठी रस्त्यांलगत टेलिफोन बुथ उभारले जातात. त्याठिकाणी टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधून कोणीही मदत घेऊ शकते. मात्र, सध्या ही यंत्रणाच त्याठिकाणी अस्तित्वात नाही. सोलापूर-पुणे, सोलापूर-विजयपूर, जळगाव-औरंगाबाद, औरंगाबाद-सोलापूर, नगर-नाशिक अशा कोणत्याही महामार्गावर ती यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे अपघातात मोबाईल तुटला किंवा चार्जिंग नसलेल्यांना वेळेत मदत मिळत नाही. दुसरीकडे जखमींना मदत केल्यास पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल ही भीती इतर वाहनधारकांमध्ये कायम आहे. त्यामुळे अपघातनंतर जखमींना वेळेत मदत मिळत नाही आणि त्यामुळेच अपघाती मृत्यू वाढल्याचेही महामार्ग पोलिसांचे मत आहे.

मदत करणाऱ्यांना पोलिस चौकशीला बोलवत नाहीत

अपघातानंतर अनेकदा इतर वाहनचालक किंवा नागरिक जखमींना मदत करायला पुढे येत नाहीत. पोलिस चौकशीचा ससेमिरा मागे लागेल, अशी त्यांच्या मनात भीती आहे. पण, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पोलिस चौकशीला बोलवत नाहीत.
- महेश स्वामी, पोलिस निरीक्षक, वाहतूक, सोलापूर ग्रामीण

साडेचार वर्षांत ५१ हजार मृत्यू
राज्यात दरवर्षी १२ ते १४ हजार व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. जानेवारी २०१८ ते १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत रस्ते अपघातात राज्यातील तब्बल ५१ हजार जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ओव्हरस्पीड, सीटबेल्ट, हेल्मेट नसणे, लेन कटिंग, मद्यपान ही कारणे मोठ्या प्रमाणावर अपघाताला कारणीभूत ठरली आहेत. ‘मृत्यूंजय दूत’ योजनेअंतर्गत २० महिन्यांत एक हजार ७४ जखमींचे जीव वाचल्याचेही महामार्ग पोलिसांनी सांगितले.

‘ड्रायव्हर हिप्नॉसिस’मुळे वाढले अपघात
कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी अनेकजण सलग १० ते १५ तास वाहन चालवितात. पण, ‘ड्रायव्हर हिप्नॉसिस’मुळेही अपघात वाढत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदवले आहे. सलग अडीच ते तीन तास वाहन चालविल्यास चालकाचा मेंदुवरील ताबा सुटतो आणि आपण वाहन चालवितोय, याचा त्याला विसर पडतो. त्यामुळे प्रत्येक अडीच-तीन तासांनी काहीवेळ थांबणे, हाच त्यावरील उपाय असल्याचेही महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT