Khadakwasala-Dam 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील धरणांत किती पाणीसाठा आहे? वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजअखेर दुप्पट उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्ध आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी जलाशयांमध्ये ३१.७८ टक्‍के पाणीसाठा होता. तो यंदा जवळपास दुप्पट म्हणजे ६०.१४ टक्‍के इतका आहे. 

गतवर्षी पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील बहुतांश प्रमुख धरणे काठोकाठ भरली होती. राज्यात पुणे, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर आणि नाशिक या विभागातील मोठ्या १४१ धरणांमध्ये गतवर्षी ३३ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध होता. तो सध्या सुमारे ६७ टक्‍के इतका आहे. मध्यम २५८ धरणांमध्ये गतवर्षी ३५.२५ टक्‍के पाणीसाठा होता. 

सध्या ५२.२८ टक्‍के पाणीसाठा आहे. तर दोन हजार ८६८ लघुसिंचन प्रकल्पांमध्ये गतवर्षी २३.४८ इतका साठा होता. तो यंदा ३५.५३ टक्‍के आहे. या सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ८६८ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा आहे.

‘खडकवासला’त १७.४८ टीएमसी साठा  
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये १७.४८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा टीएमसी 
पाणीसाठा अधिक आहे. खडकवासला धरणात पाऊण टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत आणि वरसगाव या दोन धरणांमध्ये १६.६७ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

खडकवासला प्रकल्पातील आजअखेर पाणीसाठा 
(टीएमसी आणि कंसात टक्‍केवारी)

यंदाचा एकूण साठा -     १७.४८  (५९.९७)
गतवर्षीचा साठा -     ११.३८  (३९.०३) 
पानशेत  -      ८.०६  (७५.७२)
वरसगाव  -     ८.६१ (६७.१५)
खडकवासला -      ०.७५  (३८.७८)
टेमघर  -     ०.०६  (२.१२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT