Sambhaji Nagar Controversy  
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Nagar Controversy : औरंगाबाद नामांतर वादावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश!

Sandip Kapde

Sambhaji Nagar Controversy : नामांतरावर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादच नाव सरकारी दरबारी लावू नका, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ जूनला होणार आहे.

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले होते. याला मोठा विरोध देखील झाला होता. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. मात्र आता  मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झालं होतं. पण यावरून गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर आता या शहरांसह दोन्ही जिल्ह्यांचेही नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असं करण्यात आलं आहे. याचे गॅझेट नोटीफिकेशन शासनानं काढले होते. मात्र मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्देशामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नामांतराविरोधात हायकोर्टात याचिका

औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याला केंद्राने मंजुरी दिली. पण या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल झाली आहे. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं २४ मार्चपर्यंत या नामांतराबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश केंद्राला दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT