crop loan
crop loan e sakal
महाराष्ट्र

पीक कर्जासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या

भाग्यश्री राऊत

नागपूर : मान्सूनचा (monsoon) पाऊस आल्यानंतर काही दिवसातच पेरणी सुरू होईल. त्यासाठी शेतकऱ्याने तयारी देखील आहे. सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहे. पण, याच काळात शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज भासत असते. पीक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र, हे पीककर्ज मिळवायचं कसं? त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? (documents for crop loan) याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत. (important documents for crop loan)

पीककर्ज देणाऱ्या बँका -

शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, त्यासाठी देखील काही कागदपत्रांची गरज असते.

पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रं -

रुपये १.६० लाखांपर्यंतच्या नवीन पीककर्जासाठी लागणारी कागदपत्रे -

  • 7/12 उतारा

  • 8 अ

  • नकाशा

  • आधार कार्ड प्रत

  • ३ फोटो

  • स्टॅम्प (कर्ज रकमेनुसार १०० रुपयांचे ३ किंवा ४ स्टॅम्प)

रुपये १.६० लाखांपेक्षा जास्त पीककर्जासाठी -

  • 7/12 उतारा

  • 8 अ

  • नकाशा आणि चतुर्सीमा

  • फेरफार

  • मूल्यांकन पत्र

  • सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचविलेले अतिरिक्त कागदपत्रे

  • आधार कार्ड प्रत

  • ३ फोटो

स्टॅम्प आणि स्टॅम्प ड्युटी (कर्जाच्या रकमेनुसार)

पीककर्ज नुतनीकरण करण्यासाठी -

  • 7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत देखील चालेल)

  • आधार कार्ड प्रत

  • नवीनीकरण अर्ज (बँक शाखेतून मिळेल)

  • पीकविमा काढण्याचा अर्ज, पण पीकविमा हा ऐच्छिक आहे.

पिककर्ज शेतकऱ्यांना दिलं जात असलं, तरी ३ लाखांपेक्षा कमी कर्ज घेणारे, आणि (वेगवेगळ्या बँकांच्या नियमानुसार, बहुतेक वेळा ३१ मार्चच्या आत) १२ महिन्यांच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच यात सूट दिली जाते, तुमच्याकडे १०० एकर जमीन असो किंवा १० एकर, तरीही तुम्हाला ३ लाखांच्या पिककर्जासाठीच व्याजात सूट दिली जाते.

यंदा तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज मिळणार शून्य टक्के व्याजाने -

पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी सुरू केलेला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज वाटपाचा ‘पॅटर्न’ आता राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षापासून (२०२१-२२) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ८) अर्थसंकल्प सादर करताना विधिमंडळात याबाबतची घोषणा केली. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळू शकणार आहे.

राज्यात पीक कर्जाचा व्याजदर हा द.सा.द.से. (दर साल, दर शेकडा) सात टक्के इतका आहे. मात्र, यापैकी केंद्र सरकार तीन टक्के व्याज सवलत परतावा देत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज चार टक्के व्याजाने पडत आहे. याला पुणे आणि सातारा या दोन जिल्हा बॅंकांचा मागील सुमारे दीड दशकांपासून अपवाद आहे. या दोन्ही जिल्हा बॅंका या साधारणतः मागील पंधरा वर्षापासूनच तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने वाटप करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT