Independence Day Sakal
महाराष्ट्र बातम्या

Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर CM शिंदे घेणार इर्शाळवाडीतील नागरिकांची भेट

दत्ता लवांडे

रायगड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडित नागरिकांची भेट घेणार आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे १९ जुलै रोजी भूस्खलन होऊन अनेकजणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या नागरिकांचे महाराष्ट्र शासनाकडून पुनर्वसन केले गेले आहे.

स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर या दुर्घटनेतून बचावलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार असून त्यांना मिळणाऱ्या सोई सुविधांचाही मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आले आहे.

दरम्यान, १९ जुलै रोजी झालेल्या या दुर्घटनेमध्ये २८ जण मृत्यू पावले होते. तर मातीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० जण अडकले होते. तीन ते चार दिवसांचे बचावकार्य केल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना मृत घोषित करण्यात आलं आणि बचावकार्य थांबवलं होतं. त्यानंतर बचावलेल्या नागरिकांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT