Maharashtra Inflation Rate sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Inflation Rate : महागाईचा दर राज्यात जास्त

सत्तांतरानंतरची स्थिती : शहरांत चिंता

अजय बुवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये महागाईच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असले तरी सरकारी आकडेवारी पाहता मागील सात महिन्यांपासून महाराष्ट्रातील महागाईचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्तच राहिला आहे. त्यातही शहरी भागामध्ये महागाई अधिक आहे. राज्यातील सत्तांतरानंतरही महागाईमध्ये घट झालेली नाही. राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली.

रिझर्व्ह बॅंकेच्या म्हणण्यानुसार २ ते ६ टक्क्यांपर्यंतची महागाई सुसह्य मानली जाते. त्यापेक्षा वाढलेली महागाई रिझर्व्ह बॅंकेची आणि सरकारची चिंता वाढविणारी असते. राष्ट्रीय पातळीवर देखील मागील सहा ते सात महिन्यात महागाईचा आकडा सहा टक्क्यांपर्यंत आलेला नाही. तुलनेत सप्टेंबर महिन्यात ७.४१ टक्क्यांवर असलेली किरकोळ महागाई ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्क्यांपर्यंत कमी झाली.

दिवाळीतील मागणीमुळे दर नियंत्रणात राहून देशात तीन महिन्यांत महागाई कमी झाली तरी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात मात्र महागाई ७.२२ टक्के होती. त्यातही शहरी भागात महागाईचा दर ७.४१ टक्के तर ग्रामीण भागात ६.९३ टक्के होता.

शहरी भागांत महागाईचा भडका

एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये राज्यातील शहरी भागातील महागाईचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिकच होते. याचाच अर्थ, राज्यातील शहरी भागातील नागरिकांना ग्रामीण भागाच्या तुलनेत वाढीव दराने खरेदी करावी लागली आहे. केवळ एप्रिलमध्ये ग्रामीण भागातील महागाई (९.७८ टक्के) शहरी भागाच्या (८.२३ टक्के) तुलनेत अधिक होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT