Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'ईडी, भोंगा, हनुमान चालिसाच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न'

जालिंदर सत्रे

'राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे आघाडी शासन राज्यात लोकाभिमुख काम करीत आहे.'

पाटण (सातारा) : राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) व शिवसेना (Shiv Sena) या तीन पक्षांचे आघाडी शासन राज्यात लोकाभिमुख काम करीत आहे. मात्र, विरोधक ईडी, सीआयडी, भोंगा वाजवा, भोंगा काढा, छापेमारी, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. रोजगार व वाढलेली महागाई याकडून लक्ष विचलित करुन जनतेत अस्थिरता निर्माण करीत आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

येथील श्रीमंत रणजितसिंह पाटणकर स्मारक मंदिर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), सत्यजितसिंह पाटणकर, माहिती तंत्रज्ञान प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सलक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, रविकांत करपे, सुनील गव्हाणे, बलराज पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधण्यासाठी ही परिवार संवाद यात्रा सुरू आहे. पक्ष राज्यात सर्वात मोठा असला पाहिजे, याची खुणगाठ ठेवून कार्यकर्त्यांनी बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून मंत्री पाटील म्हणाले,‘‘ कार्यकर्त्यांनी अपेक्षा सांगितल्या. सहयोगी पक्षाच्या नेतृत्वाकडून होणारा त्रास सांगितला. हा विषय गांभीर्याने घेऊन महाआघाडीच्या बैठकीत यावर योग्य तोडगा काढला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून सत्यजितसिंह पाटणकर व कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहिल.’’

पालकमंत्री पाटील म्हणाले,‘‘ पाटण तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबत सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsingh Patankar) दक्ष असतात. आपत्ती काळात मी ते जवळुन पाहिले आहे. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना माजी कायम सहकार्याची भूमिका असते.’’ खासदार पाटील म्हणाले,‘‘ दुर्गम भागातील आमचा तालुका कायम शरद पवारांच्या विचारांचा पाईक राहिला आहे. यश अपयश येत रहाते मात्र लोकांच्या मनात अढळ स्थान विक्रमसिंह पाटणकर यांनी निर्माण केले. तोच वसा सत्यजितसिंह पाटणकर यांनी चालविला असून आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार, सुभाष पवार, बाळा कदम यांनी आपल्या अडचणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कानावर घातल्या. मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उपस्थितांचे स्वागत राजाभाऊ शेलार यांनी केले व आभार सुभाष पवार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT