महाराष्ट्र

जयंत पाटलांच्या आवाहनाला स्वाभिमानीकडून प्रत्युत्तर; जाधव म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

सांगली: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कोणते प्रश्‍न सोडवले, याची यादी जाहीर करावी आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) खोटे बोलत असतील, तर ते उघड करावे, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते भागवत जाधव (Bhagwat Jadhav) यांनी दिले आहे.

पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडू नये, तुमची सगळी कामे केली आहेत, असे आवाहन केले होते. त्याला स्वाभिमानीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जाधव म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कोणते प्रश्‍न सोडवले, याची यादी जाहीर करावी.

जयंत पाटील यांनी जनतेसमोर राजू शेट्टी यांनी कोणती कामे सांगितली होती आणि ती कधी पूर्ण केली, याची यादी द्यावी. राजू शेट्टी यांनी जलसंपदा विभागाकडून धरणांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे उघड केले. खासगीकरणामुळे शेतकऱ्यांला सहा पैसे युनिटची वीज सहा रुपयाने मिळणार असल्याचे स्पष्ट केले. पूरग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून १४० किलोमीटर पायी यात्रा काढली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या एवढी ९६० रुपये प्रतिगुंठा मदत देऊ, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात १३५ रुपये दिले गेले. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप या महाविकास घाडीच्या सरकाराने केले. अशा सरकारसोबत आम्ही का राहायचे असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT