महाराष्ट्र बातम्या

येडीयुरप्पा,पाटलांच्या बैठकीत कर्नाटकसाठी महत्वाचा निर्णय

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : दरवर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून (maharastar,karnantak)कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा महत्वाचा निर्णय शनिवारी बंगळूर येथील बैठकीत झाला. पाणीवाटप, पूरनियंत्रण व जलाशयांमधील पाण्याचा विसर्ग या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा(b.s.yediyurappa,jayant patil) व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

उन्हाळ्यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती उद्भवते. त्यावेळी कर्नाटकाकडून कोयना जलाशयातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जाते. शनिवारी बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. त्यावर उन्हाळ्यात पाणीटंचाई स्थितीत कर्नाटकाला चार टीएमसी पाणी दिले जाईल अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. त्याच्या मोबदल्यात पावसाळ्यात कर्नाटक महाराष्ट्राला चार टीएमसी पाणी देईल असे ठरले. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.

महाराष्ट्रातील दुधगंगा प्रकल्प कर्नाटकासाठीही महत्वाचा आहे, तो प्रकल्प दोन वर्षात पूर्ण केला जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. कृष्णा व भीमा नदीच्या सिंचन क्षेत्रात पाणीवाटप व पूरस्थिती नियंत्रणासाठी दोन्ही राज्याचे मंत्री, सचिव व अधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्याचा निर्णय झाला. पावसाळ्यात दोन्ही राज्यांमधील पावसाचे प्रमाण व धरणांमधील पाण्याचा विसर्ग संदर्भातील प्रत्येक क्षणाची माहिती दोन्ही राज्यांनी एकमेकांना देण्याचे बैठकीत चर्चेअंती निश्चित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT