Jitendra Awhad Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : आत्ताची कारणं खोटी, गद्दारी करायचं आधीच...; आव्हाडांनी सुनावलं!

राज्यातला सत्ताबदल करण्यासाठी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी काऊन्सिलिंग करण्यासाठी बैठका घेतल्याचं आज तानाजी सावंतांनी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. २०१९ चा सत्ताबदल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी घडवून आणल्याचं सावंत म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल एक ट्वीट केलं आहे. यामध्ये गद्दारी करायची हे आधीच ठरलं होतं, असंही आव्हाड म्हणाले आहेत. तसंच आत्ता हे देतायत ती कारणं खोटी असल्याचं सिद्ध होतं, असंही आव्हाड म्हणाले.

आव्हाड म्हणाले, "आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर १००-१५० बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १००-१५० बैठका घेतल्या."

"आमदारांचं मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT