jitendra awhad
jitendra awhad sakal media
महाराष्ट्र

'राष्ट्रपती राजवट लावा', भाजप नेते दिल्लीत पोहोचण्याआधीच आव्हाडांचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसा पठण हा विषय गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे. याच संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

"राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल", असं ट्वीट राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून राणा दाम्पत्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या विषयामुळे खळबळ सुरू आहे. याची परिणती राणांच्या अटकेत झाली. भाजपच्या काही नेत्यांवर हल्ले देखील झाले. यानंतर भाजपचं शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला रवाना होणार आहे. त्याआधीच आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.

राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर केलेलं आंदोलन, त्यानंतर राणा यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत आपला निर्णय मागे घेणं, भाजपा नेते मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला आणि राणा दाम्पत्याची अटक या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा नेत्यांकडून सातत्याने होत आहे. त्या संदर्भाने जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT