Jitendra Awhad and Raj Thackeray Jitendra Awhad and Raj Thackeray
महाराष्ट्र बातम्या

आव्हाड म्हणाले, राज ठाकरेंना वाटते की ते बाळासाहेब होऊ शकतात, म्हणून...

सकाळ डिजिटल टीम

धार्मिक स्थळ अधिकृत की अनधिकृत या वादात मला पडायचं नाही. कारण, महाराष्ट्रात हा वाद खूप मोठा होतो. धार्मिक स्थळाचा वाद हा नेहमीच मोठा होतो. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अचानक वाटायला लागले की ते बाळासाहेब होऊ शकतात. यामुळेच त्यांनी भोंग्यांचा विषय उकरून काढला, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मशिदींवरील भोंग्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणत आहे. ते असे म्हणत आहे याचा मला खूप आनंद झाला. कारण, भोंग्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात दंगे होतील, जाळपोळ होतील अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती. मात्र, तसे काहीही झाले नाही. यामुळे ते आंदोलनाला यश आले असे म्हणत आहेत तर चांगलेच आहे, असेही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोंग्यांच्या विषय काढण्यात आला आहे. कितीही केले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांसारखे होऊ शकत नाही, असेही जितेंद आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT