ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्छा देताना आव्हाड यांनी केलेलं ट्वीट सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरलं आहे.
आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना शुभेच्छा देताना सैन्य भरती प्रकरणी आशा व्यक्त केली आहे. ''प्रिय अण्णा.....
आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई ,वाढती बेरोजगारी,सामाजिक तेढ ,ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल ह्याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा!'' असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारतीय सैन्यदलांतील नवीन प्रकारच्या सैन्य भरतीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल केली होती.
या मिशनद्वारे ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी चार वर्षांसाठी तरूणांची सैन्यभरती करण्यात येईल. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरूणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाईल व उर्वरीत उमेदवारांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळेल.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्वस्तरातून संमिश्र प्रतिक्रीया येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.